मुंबई- गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. 26 जानेवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. पब आणि बारसाठी नवे नियम नाहीत, पूर्वीप्रमाणेच दीड वाजेपर्यंतची मर्यादा कायम राहणार असल्याचंही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. दिवाळी आणि गणपतीच्या सणांच्या वेळी आपण रात्रभर फिरत असतो. नाइटलाइफ सुरू केल्यानं अनेक जण तीन शिफ्टमध्ये काम करतील. महसुलाबरोबरच नोकऱ्यांमध्येही वाढ होणार आहे. आता पोलीसवाले दीड वाजेपर्यंत दुकानं खुली आहेत की बंद याचा आढावा घेत फिरत होते. आता त्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करायचं असून, त्यांना खरं पोलिसांचं काम करायला देणार आहे. जर कोणत्याही मॉल किंवा कंपनीला वाटलं खासगी सुरक्षा द्यावी, तर तीसुद्धा आम्ही खासगी सुरक्षा पुरवणार आहोत. उत्पादन शुल्काचे कायदे बदललेले नाहीत.
Maharashtra Minister Aaditya Thackeray: Proposal of Mumbai 24x7 has been approved by Cabinet today. From 27th January malls, multiplexes,shops&eateries in non-residential areas like Bandra Kurla Complex&Nariman Point will remain open 24x7. However, we won't impose this on anyone.
79 people are talking about this


