मुख्यमंत्र्यांवरच्या नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेचं प्रत्युत्तर; वैभव नाईक म्हणतात…

0 झुंजार झेप न्युज

काल खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. या टीकेला शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय.

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टीका करणाऱ्या भाजप नेते नारायण राणेंचा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी चांगलाच समाचार घेतलाय. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नसल्यामुळे कोरोनाचा बाऊ करून अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मुख्यमंत्री पळ काढत असल्याची टीका काल खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. या टीकेला शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय.

एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून काही गोष्टी कराव्या लागतातः वैभव नाईक

कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. नारायण राणे काय बोलतायत त्याकडे लक्ष देण्याची मुख्यमंत्र्यांना गरज नाही. तर लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून ज्या गोष्टी कराव्या लागतील, त्या उद्धव ठाकरे करत आहेत.

लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहेः वैभव नाईक

लोकांनीसुद्धा त्या मान्य केल्या आहेत. मर्यादित स्वरूपात लग्न समारंभ, कार्यक्रम व्हावेत आणि गर्दी कमी व्हावी यासाठी लोकही आता प्रयत्न करतायत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लोकही प्रतिसाद देतायत. त्यामुळे राणे काय बोलतायत याकडे लक्ष देण्याची गरज नाही. लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि ती योग्य प्रकारे उद्धवजी पार पाडत आहेत.

राणेंच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही

गेलं अधिवेशनसुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पार पडलं होतं आणि येणारे उन्हाळी अधिवेशन एक मार्चला सुरू होतेय, ज्या प्रमाणे ठरलंय त्या प्रमाणे हे अधिवेशन पार पडेल. आजच पार्लमेंटरी कमिटीची बैठक मंत्रालयात होतेय, त्यामुळे निश्चितच हे अधिवेशन पार पडणार असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलं आहे. मात्र नारायण राणेंनीच गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या गोष्टीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राणेंच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचा पलटवार वैभव नाईक यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.