पिंपरी चिंचवड महानगरपालिका घरकुल योजनेतील संगणकीय सोडत

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिका घरकुल योजनेतील संगणकीय सोडत 

पिंपरी चिंचवड,दि.17: घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो त्यामुळे घरकुलच्या माध्यमातुन नागरीकांचे घराचे स्वप्न साकार होत असताना आनंद वाटत असून नागरिकांनी त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा. आपल्या परिसरात स्वच्छता ठेवावी व मिळालेली सदनिका विक्री अथवा भाड्याने देवु नये असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले. केंद्र व राज्य शासनाचे सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असुन या प्रकल्पातील २ सोसायट्यांच्या इमारती मधील एकुण ८४ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत १७ ऑक्टोबर २०२२ रोजी ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सहायक आयुक्त सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे, मुख्य लिपिक हनमंता निली, सिद्धप्पा पाटील कॉम्प्युटर ऑपरेटर सुनिता चौगुले पाटील लिपिक योगिता जाधव यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. १४६ इमारत क्र. डी-६ चे अध्यक्ष महेंद्रकुमार गायकवाड, सोसायटी क्र. १४७ इमारत क्र. डी-७ चे अध्यक्ष शिवकुमार पिल्ले यांचा अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लाभार्थींनी आता हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. घराचा वापर स्वत: करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारती भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे असे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले.यावेळी सहायक आयुक्त सुषमा शिंदे यांनी प्रास्ताविक करताना प्रकल्पाची माहिती, घराचा वापर, येणारे देयके व बँकेचे हप्ते वेळेवर भरणेबाबत मार्गदर्शन केले. तर मुख्य लिपिक विष्णु भाट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.