देशात सीएए आणि एनआरसी विरोधात वातावरण तापले आहे. त्यातच आज बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज (ता. 29) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मोर्चाने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमविरोधात हि हाक दिली असून व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आले आहे.
बहुजन क्रांती मोर्चाच्या या भारत बंदला शाहीन बागमधील आंदोलक महिलांनाही पाठिंबा दिला आहे. आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला असून संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
मात्र सततच्या बंदचा परिणामांना त्रासलेल्या व्यापाऱ्यांनी आजचा भारत बंद पाळणार नसल्याचे निवेदनपरळी शहर व्यापारी महासंघाने प्रशासनाला दिलं आहे. सरकारविरोधात असलेल्या आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्य जनता आणि व्यापार्यावर होत आहे. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक हानी होत आहे. 2019 मध्ये जवळजवळ वीस एक वेळा व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली आहेत, असं निवेदनात म्हटले आहे.

