Video: देश के गद्दारो को...गोली मारो ***; केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधक संतप्त

0 झुंजार झेप न्युज

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर एका वादग्रस्त घोषणेमुळे अडचणीत आले आहेत. ते सोमवारी दिल्लीतील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भर सभेत 'देश के गद्दारोंको.... गोली मारो', असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला.
अनुराग ठाकूर यांचे हे वक्तव्य चिथावणीखोर असल्याचे आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. प्रशांत भूषण यांनी हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर अनुराग ठाकूर यांच्यावर टीकेची झोड उठली. अनुराग ठाकूर यांना एव्हाना तुरुंगात असायला पाहिजे होते, असे प्रशांत भूषण यांनी म्हटले.
तर काँग्रेसकडूनही ठाकूर यांच्यावर निशाणा साधण्यात आला. मोदी सरकारपुढे जनतेपुढे मांडायला ठोस असे काहीच नाही. त्यामुळे भाजपकडून ध्रुवीकरणाचा आवडता डाव खेळला जात आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली.
रिठाला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर अनुराग ठाकूर, हंसराज अहिर यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी भाषणादरम्यान 'देश के गद्दारो को' असे उच्चारताच जमावाने 'गोली मारो' अशा घोषणा दिल्या. व्यासपीठावरील एका नेत्यानेही हीच घोषणा दिली. मात्र, अनुराग ठाकूर यांनी लगेच त्या नेत्याला रोखले. मात्र, भाजपच्या नेत्यांना ठरवून जमावाकडून अशाप्रकारच्या घोषणा वदवून घेतल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
Shocking: It was a local BJP leader from Delhi back then, its now a front line BJP leader and MoS Finance, Anurag Thakur who is leading the crowd to chant “Desh ke gaddaron ko, Goli maro salon ko”.

Such is the level of politics, ladies and gentlemen!
6,454 people are talking about this

या सगळ्या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने स्थानिक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. काँग्रेसने या वक्तव्याप्रकरणी अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.