मुंबई | चीनमध्ये कोरोना विषाणूने हैदोस घातला आहे. यासाठी चीन सरकारचे युद्ध पातळीवर सुरू आहेत. यावर चीनसह जगभरात कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे. यावर आपल्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रूग्ण नसल्याचं, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
राज्यात शासनाने राज्यशासनाच्यावतीने याबाबत खबरदारीचा उपाय घेण्यात येत आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनरद्वारे प्रवाशांची तपासणी केली जात आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये एकूण 1739 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 6 जण महाराष्ट्रातील होते. त्यात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळून आलेला नसल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चीन सरकारने कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी फक्त 10 दिवसात 1000 बेड बसतील इतकं मोठं रूग्णालय बांधलं आहे.

