आज रात्री 9 पर्यंतचा ‘जनता कर्फ्यू’ उद्या पहाटे 5 पर्यंत, गरज पडल्यास 31 मार्चपर्यंत वाढणार – आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे

0 झुंजार झेप न्युज


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर सुरू असलेल्या जनता कर्फ्यूची मुदत आज रात्री नऊ वाजता संपत असली तरी राज्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात जनता कर्फ्यूची मुदत पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार देशातील नागरिक आज सकाळी सात वाजल्यापासून जनता कर्फ्यूमध्ये सहभागी झाले आहे. एकूण 14 तासांच्या जनता कर्फ्यूची मुदत रात्री नऊ वाजता संपत आहे.
राज्यात आज 11 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे राज्यातील कर्फ्यू आठ तासांनी म्हणजे पहाटे पाचपर्यंत वाढविण्यात येत आहे,  असे टोपे यांनी जाहीर केले. पहाटे पाचनंतर 31 मार्चपर्यंत राज्यातील शहरी भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना साथीवर मात करण्यासाठी राज्यात 31 मार्चपर्यंत लॉक डाऊनची घोषणा केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.