ठाण्यात म्युकर मायकोसिसच्या 5 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया; डॉक्टरांच्या टीमला मोठं यश

0 झुंजार झेप न्युज

राज्यात म्युकर मायकोसिसमुळे डोळे जाण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ठाणे: राज्यात म्युकर मायकोसिसमुळे डोळे जाण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ठाण्यातही म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ठाण्यातील म्युकर मायकोसिसच्या पाच रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. त्यामुळे म्युकर मायकोसिसचे लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता उपचार करून घ्यावेत, असं आवाहन ठाणे पालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केलं आहे.

कोरोना झाल्यानंतर म्युकर मायकोसिस या नवीन बुरशीजन्य रोगाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. परंतु वेळेत योग्य उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिस पूर्ण बरा करू शकतो. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने हे शक्य करून दाखवले आहे. 5 म्युकर मायकोसिस रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे, असं पालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सांगितलं.

ग्लोबल रुग्णालयातील रुग्ण

ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयाकडून म्युकर मायकोसिसचे हे 5 रुग्ण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पाठवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने तात्काळ या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जून ते ऑगस्ट महिन्यात 2 रुग्णांवर तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत 3 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून योग्य उपचारांनंतर सर्व रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत.

चार डॉक्टरांची टीम

म्युकर मायकोसिसच्या उपचार पद्धतीसाठी डेन्टिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट, भूलतज्ज्ञ अशा डॉक्टरांच्या एकत्रित टीमने या सर्व शस्त्रक्रिया केल्या आहेत. यामध्ये मेडिसीन विभागाचे डॉ. योगेश शर्मा, डॉ. सुमन राठोड, शस्त्रक्रिया विभागाच्या डॉ. श्वेता बाविस्कर तसेच डॉ. अमोल खळे या तज्ज्ञ डॉक्टर्सचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.