विहामांडवा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास भाजपातर्फे अन्नत्याग आंदोलन
विहामांडवा,(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): विहामांडवा सर्कल मधील शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडल्यास भारतीय जनता पार्टी विहामांडवा सर्कल तर्फे अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा पैठण ता सरचिटणीस दत्ता वाकडे व विहामांडवा शहर अध्यक्ष विलास संत यांनी दिला आहे,
यावर्षी विहामांडवा सर्कल मध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी महावितरणकडून शेतकऱ्याचे तोडण्यात येणारे वीज कनेक्शन मुळे शेतकरीआणखीन संकटात सापडला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले ते पुन्हा जोडण्यात यावे नसता भाजपातर्फे अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असे निवेदन विहामांडवा येथील सबस्टेशन ऑफिस येथे आपेगाव शाखेचे सहाय्यक अभियंता श्री संतोष सुर्वे ,विहामांडव्याचे वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश जाधव, तंत्रज्ञ फिरोज शेख, यांना देण्यात आले, या प्रसंगी पैठण ता सरचिटणीस दत्ता वाकडे, विहामांडवा शहर अध्यक्ष विलास संत ,सर्कल प्रमुख डिगाबर नाटकर, शंकरराव धायकर,जिल्हा उपअध्यक्ष विजयसिंह बोडखे,भाजपाचे नेते हरीपंडीत नवथर, भागवत डुकरे ,सुधाकर वाकडे,जगनराजे निबाळकर, पाराजी मोरे ,युवराज बोडखे,आत्माराम ऊरूणकर, पांडुरंग ताडे ,भागवत डुकरे ,सदाशिव बडे, यांची उपस्थिती
