शालेय विद्यार्थ्यांचे तंबाखूबाबत समुपदेशन करा-जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.

0 झुंजार झेप न्युज

शालेय विद्यार्थ्यांचे तंबाखूबाबत समुपदेशन करा-जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.

वाशिम,दि.12 : बालवयात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले तर आयुष्यभर विद्यार्थी त्याचे अनुकरण करतात. शालेय विद्यार्थी हा तंबाखूच्या आहारी जाणार नाही, याबाबत शिक्षकांनी दक्ष राहून काम करावे. शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परीणामांची जाणीव करुन देवून त्यांच्या समुपदेशनाचे काम शिक्षकांनी करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी केले.

आज 12 ऑक्टोबर रोजी नियोजन भवन येथील सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी षन्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला सहायक पोलीस अधिक्षक संदीप भामरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षन्मुगराजन पुढे म्हणाले, जिल्हयात कोणत्याही शेतात तंबाखू पिकाचे उत्पादन घेण्यात येत असल्यास त्याची खात्री कृषी विभागाने करावी. शासकीय कार्यालयाच्या विविध इमारतीमध्ये पान, खर्रा व तंबाखू खाऊन मोठया प्रमाणात थुंकल्याने हया इमारती विद्रुप व अस्वच्छ दिसून येत आहे. यापुढे अशा शासकीय इमारतीत कोणीही धुम्रपान करणार नाही, याकडे लक्ष दयावे. धुम्रपान करतांना कुणी आढळल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. जिल्हयात कोटपा कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. असे त्यांनी सांगितले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड म्हणाले, तंबाखूच्या दुष्परीणामाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हयातील शाळा व महाविद्यालये तंबाखूमुक्त राहील याकडे आपले लक्ष आहे. विविध आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे. सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा- 2003 ची देखील जिल्हयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदीचे पालनावर आपला भर असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. बैठकीत संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.