विहामांडवा येथे कामगार विभागांतर्गत मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ
विहामांडवा,दि.10 (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): संजयराजे निंबाळकर(माजी.सरपंच), तसेच विहामांडवा चे सरपंच नागेश आष्टीकर यांच्या हस्ते मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ.करण्यात आला. गावामध्ये ठिक ठिकाणी भोजनाचे वाटप करण्यात आले. आज पासून कामगारांना मध्यान्ह भोजनाचा लाभ मिळणार आहे.कष्टकरी माणसाला अन्नाचे महत्व अधिक समजते. अन्न आपण शक्ती समजतो, प्रेरणादाई समजतो, अन्नाशिवाय तर जीवनच नाही. आमचे कामगार काबाड कष्ट करतात, त्यांच्या आरोग्यासाठी व कष्ट करण्याची उर्जा मिळवून देण्यासाठी शासनाच्या कामगार विभागाने मध्यान्ह भोजन ही संकल्पना अंमलात आणली.
या योजनेच्या विहामांडवा येथे आज दिनांक (१०) रोजी शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी ग्रा.प.सदस्य दिपक गाभूड, ग्रा.प.सदस्य विनोद निंबाळकर, ग्रा.प.सदस्य बाबासाहेब नाचण, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर, सामजिक कार्यकर्त्यां सुलोचनाताई साळूंके, प्रल्हाद ऐखंडे, राजेंद्र हुंडीवाले, प्रभाकर आवारे, मुन्ना ढाकेफळे, शब्बीर शेख, गोपीनाथ येळे,रवि नरे, उपस्थित होते.या योजनेमुळे कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या भावना दिसल्या.
फोटो कॅप्शन; विहामांडवा येथे ठीक ठिकाणी भोजन वाटप करताना संजय राजे निंबाळकर नागेश आष्टीकर व इतर मान्यवर.

