श्री.रेणुकादेवी शरद सहकारी कारखाना च्या निवडणूकीत पालकमंत्री भुमरे साहेब यांचे वर्चस्व...
पैठण,दि.27 (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील विहामांडवा परीसरातील चौंढाळा येथील काल पार पडलेल्या श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संदीपाण पाटील भुमरे यांनी एकतर्फा व तब्बल 2 हजार मतांनी आपला पॅनल निवडून आणला असून तालुक्यात परत आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे, भुमरेसाहेबांनी सांगितले कि पाच ते सहा वर्षांपुर्वी जनतेच्या अशिर्वादाना ताब्यात घेऊन सुरूळीत चालु केला,आणि आपण एक रूपया ही कर्ज घेतले नाहि जे काय कर्ज आहे ते आपल्या ताब्यात कारखाना येण्या अगोदरचे आहे, श्री रणुकादेवी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपला 21 ही जागांवर विजय झाला, मी सर्व श्रेय मतदार बंधू जनतेला देत आहे,असे भुमरे साहेब यांनी सांगितले,
विजय उमेदवारांना मिळालेली एकूण मते,गवांदे चंद्रकांत भुजंगराव 3313, डागे लक्ष्मण दगडू 2877,नवथर विष्णू श्रीपतराव 2843, गाभूड भगीरथाबाई मुरलीधर मते 3038,लांडगे पुष्पा भारत 2934,काकडे द्वारकबाई 3097,बढे दयनदेव 3099, व बिनविरोध आलेले 14 उमेदवार ,भुमरे राजु आसाराम,भुमरे विलास संदिपान,शेख आफसर बशीर , तांबे नितीन जनार्दन , डुकरे अक्षय घनश्याम,धायकर कल्याण लक्ष्मण , बोडखे दिलीप रामराव, नरके ब्रह्मदेव सुखदेव ,वाकडे भीमराव जयराम,गोजरे त्रिंबक सुभाष , थोरे अमोल गणेश ,पठाडे नंदू सोनाजी चावरे सुभाषराव नानाराव ,तवार भरत बापूसाहेब ,व विरोधी पॅनल च्या उमेदवारांना 1 हजार पेक्षा कमी मते मिळाल्याने पालकमंत्री भुमरे साहेबांचे उमेदवार तब्बल 2 हजार मतांनी निवडून आले आहे.

