हे सरकार दारुड्यासारखे, सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकायला निघालेत - प्रकाश आंबेडकर

0 झुंजार झेप न्युज

पुणे | केंद्र सरकाची अवस्था दारूड्यासारखी झाली आहे. दारू मिळाली नाही तर दारूडा जसा घरातील वस्तू विकतो त्याप्रमाणे हे सरकार भारतीय पेट्रोलियम कंपनी विकायला निघाले आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्याविरोधात प्रकाश आंबेडकरांनी 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र बंद करून झोपलेल्या सरकारला जागं करू हे बंद शांततेनं करणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याऐवजी लोकांनी हक्काच्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या झेंड्याखाली आंदोलन करावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.