सीरमची आग अपघात की घातपात?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

0 झुंजार झेप न्युज

सीरमच्या आगीची घटना हा अपघातच असावा, असं म्हणत घातपाताचा संशय शरद पवारांनी फेटाळून लावला. 

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला गुरुवारी आग लागली होती. काही तासांनी ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. मात्र आगीनंतर अनेकांनी ही आग लावली की लागली?, अशा संशयास्पद कमेंट व्यक्त केल्या. यामध्ये राजकीय पक्षांचे नेतेही पाठीमागे नव्हते. सीरमच्या आगीवरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी आगीच्या घातपाताची शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळून लावली. 

सीरमच्या आगीबाबत भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी शंका व्यक्त केली. हा घातपाताचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनी उपस्थित केला. मुक्ता टिळक यांच्या शंकेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही हीच शंका व्यक्त केली. त्यानंतर अनेकांनी घातपातीची शक्यता दबक्या आवाजात व्यक्त केली.

मात्र या सगळ्या चर्चा केवळ चर्चाच आहेत. यामध्ये तथ्य नसल्याचं अप्रत्यक्षपणे पवारांनी सांगितलं. सीरम इन्सिट्यूटच्या स्टाफवर माझा संपूर्णपणे विश्वास आहे. आगीची घटना हा अपघातच असावा, असं म्हणत घातपाताचा संशय शरद पवारांनी फेटाळून लावला.

घातपाताची शक्यता- आ. मुक्ता टिळक

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही आघपात तर नाही ना, अशी शंका भाजपच्या आमदार मुक्ता टिकळ यांनी व्यक्त केली होती. कोरोनाचं संकट अद्याप कायम आहे. त्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचा इमारतीलाच ही आग लागल्यानं हा घातपात तर नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केलीय.

आग लागली की लावली?, चौकशी झाली पाहिजे- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यादरम्यानच त्यांना सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबत माहिती मिळाली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मलाही व्हॉट्सअॅप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजलं. पण ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे”


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.