मनसेतही मेगाभरती सुरु, ‘कृष्णकुंज’बाहेर झुंबड, काही डबेवालेही ‘रेल्वे इंजिना’त!

0 झुंजार झेप न्युज

मनसेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांची झुंबड उडल्याचं चित्र आहे. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजबाहेर गर्दी झाली आहे.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी (BMC Election 2021) विविध पक्षांमध्ये मेगाभरती सुरु झाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसेही (MNS) मैदानात उतरली आहे. मनसेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांची झुंबड उडल्याचं चित्र आहे. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजबाहेर गर्दी झाली आहे. पक्षप्रवेशासाठी कृष्णकुंजबाहेर अनेकांनी गर्दी केली.

बोरिवली विधानसभा क्षेत्रातील वकिलांचा मनसेत पक्षप्रवेश होत आहे. याशिवाय क्षितीज गृपचे सदस्य मनसेत पक्षप्रवेश करणार आहेत. मनसेने ज्या शाळेच्या फी वाढीविरोधात आंदोलन केलं, त्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पालकही मनसेवासी होत आहेत. इतकंच नाही तर डबेवाल्यां मनसेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांची झुंबड उडल्याचं चित्र आहे. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजबाहेर गर्दी झाली आहेचे काही प्रतिनिधी मनसेत प्रवेश करुन ‘रेल्वे इंजिनात’ बसणार आहेत.

मनसे अॅक्शन मोडमध्ये

मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. मराठीसाठी आग्रह असलेल्या मनसेने अॅमेझॉनविरुद्ध मोहीम उघडली. त्यानंतर मनसेने आपला मोर्चा डॉमिनोजकडे वळवून मराठीचा आग्रह धरला.

ग्रामपंचायत निवडणुका लढणार

राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे मनसेही या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विदर्भातही रणशिंग फुंकलं

भाजपचा गड असलेल्या नागपूर जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. गाव पातळीवरुन संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विदर्भातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मनसेच्या एन्ट्रीमुळे नेमका कुणाचा फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार, याचा फैसला 18 जानेवारीलाच होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.