'हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय'; आनंद शिंदें यांचं गाण्यातून फडणवीस यांना उत्तर

0 झुंजार झेप न्युज

पार्श्वगायक आनंद शिंदे यांच्या गाण्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात रंग चढले आहेत. 'हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय', असं म्हणत आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सत्ता बदलाच्या संकेताला गाण्यातून उत्तर दिलं आहे. 'नाद करा पण आमचा कुठे' असंही शिंदे म्हणाले.

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराचे सर्व फंडे वापरायला सुरुवात झाली आहे. भल्याभल्या वक्त्यांपेक्षा ज्येष्ठ पार्श्वगायक आनंद शिंदे यांच्या भाषणाला मतदार डोक्यावर घेताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रचारसभांमध्ये सत्ता बदलाबाबत वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना आनंद शिंदे म्हणाले की, "हे पवार साहेबांचं सरकार आहे, तुमच्या बापालाही पडणार नाही." 

गायक आनंद शिंदे हे मूळचे मंगळवेढ्याचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना आता प्रचारात उतरवले आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही ठिकाणी त्यांना जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. आनंद शिंदे यांची अनेक गाणी लोकप्रिय आहेत आणि गाण्यात प्रचाराचे काव्य गुंफून आनंद शिंदे यांनी धडाका उडवून दिला आहे. त्यांच्यासोबत अमोल मिटकरी, रोहित पवार यांच्यासारखे वक्ते असूनही नागरिकांमध्ये आनंद शिंदे यांची निवडणूक गाणी लोकप्रिय होत आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता बदलाच्या दिलेल्या संकेताला आनंद शिंदे आपल्या गाण्यातून उत्तर देत आहेत.

तुम्ही चिडवताय, आम्ही चिडणार नाय,तुम्ही लय काय करताय, तसं काय घडणार नाय,तुम्ही रडवताय, पण आम्ही रडणार नायहे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय आनंद शिंदे यांच्या या गाण्यांना कार्यकर्ते डोक्यावर घेत आहेत.मी अपीअर घेतल्याशिवाय कोठेही बाहेर जात नाही हे महाराष्ट्राला माहित आहे. पण भारत भालके हे गाववाले म्हणून माझ्या हृदयात होते आणि म्हणूनच मी त्यांचा मुलगा भागीरथसाठी प्रचारात उतरल्याचे आनंद शिंदे सांगतात.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.