सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार कर संकलन कार्यालये

0 झुंजार झेप न्युज

▪️ विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी उरले फक्त दोन दिवस

▪️ सब हेड- कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी कराचा भरणा करावा : महापालिकेचे आवाहन

पिंपरी चिंचवड: बकरी ईद आणि आषाढी एकादशीनिमित्त उद्या गुरुवारी महापालिकेला शासकीय सुट्टी आहे. मात्र, महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी सर्व कर संकलन कार्यालये सुरुच ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी असून आपल्या चालू वर्षाचा आणि थकीत कर भरावा, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांसाठी 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल 20 टक्के सवलत मिळत आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 2 लाख 69 हजार 662 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा करून विविध कर सवलतींचा लाभ घेतला आहे. महापालिका तिजोरीत तब्बल 370 कोटी रुपये जमा झाले आहेत.

सन 2023-24 या आर्थिक वर्षांतील मिळकतकरांची बिले सिध्दी प्रकल्पा अंतर्गत बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून घरोघरी 100 टक्के वाटप केली आहेत. याचा कर वसूलीतून मोठा फायदा झाला असल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी म्हटले आहे.

शहरातील मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी 17 विभागीय कार्यालये आणि ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी 30 जूनची मुदत आहे. नागरिक संबंधित कर संकलन कार्यालयात बिले भरण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे गुरुवारी महापालिकेला सुट्टी असली तरी कर संकलनची सर्व कार्यालये सुरुच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

प्रतिक्रीया...

विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी कर संकलनची सर्व कार्यालये सुरुच राहणार आहेत. तसेच शहरातील कोणत्याही भागातील मालमत्ता धारकांना कोणत्याही विभागीय कार्यालयात कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक पिंपरी-चिंचवड महापालिका


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.