पँथर सुवर्ण महोत्सव सोहळा मिरा-भाईंदर येथे मोठ्या उत्साहात.
मुंबई,दि.10: रिपाई-आ राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांचे झंजावती दौरे.दलीत पॅथरच्या सूवर्ण मोहत्सवा निमित्त ऐतिहासिक व दिमागदार सोहळयाचे आयोजन महाराष्ट्र भरात होत आहे या सोहळ्या निमित्त हजारो पॅथर शी संवाद व त्यांच्या आठवणींना उजाळा व भविष्यात पॅथरची गरज या विषया वरती महाराष्ट्र भरातील प्रमूख आंबेडकरी चळवळीतील वक्ते व मार्गदर्शकाची मते जानून घेण्यासाठी या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे व आपल्यातील पॅथर काल हि जिवंत होता व आज ही आणी उद्या ही पॅथरची डरकाळी कायम राहणार असल्याचे प्रतिपादन मा.ना.रामदासजी आठवले साहेब आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मांडताना दिसत असताना व या सोहळ्याना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनसह रिपब्लिकन पक्षाच्या पदाधीकारी यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत असताना नवी चेतना निर्माण होत आहे व काल ही मिरा भाईंदर रोड येथील लता मंगेशकर महानगरपालिकेच्या भव्य सभागृहात दलीत पॅथर सूवर्ण मोहत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात अनेक पॅथर व रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते,पदाधीकारी आणी कार्यकर्त्यांनसह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

