भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उत्तुंग भरारी घेण्याचा अधिकार - ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे

0 झुंजार झेप न्युज

संविधान दिनानिमित्त सुप्रसिद्ध गायक संदेश उमप यांच्या सुरेल आवाजात भारतीय संविधानाला मानवंदना

पहिल्या दिवशी शाहिरीव्याख्यानगीतांच्या  कार्यक्रमासोबतच स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान 


पिंपरी चिंचवड दि. २७ नोव्हेंबर २०२५ : भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उत्तुंग भरारी घेण्याचा अधिकार प्राप्त झाला असून भारतीय संविधान म्हणजे स्वातंत्र्यसमताबंधुता आणि न्याय प्रस्थापित करणारा मानवमुक्तीचा जाहिरनामा आहेअसे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांनी केले.

 

भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पिंपरी येथील प्रबोधनात्मक कार्यक्रमात  भारतीय संविधान -मानवमुक्तीचा जाहिरनामा’ या विषयावर व्याख्यान देताना जोंधळे बोलत होते. या कार्यक्रमास राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडेमहापालिका  उप आयुक्त अण्णा बोदडेविशेष अधिकारी किरण गायकवाडग्रंथालय प्रमुख प्रतिभा मुनावतग्रंथपाल प्रवीण चाबुकस्वारराजू मोहनराजेंद्र आंभेरेकांचन कोपर्डेकामगार नेते निवृत्ती आरवडेसामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळेदिपक म्हस्के आदी उपस्थित होते.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रचनेत मानवी मूल्यांच्या संरक्षणाचा वारसा अधोरेखित केला आहेअसे नमूद करून जोंधळे म्हणालेभेदभावमुक्त समाजसमतास्वातंत्र्य आणि बंधुता ही मानवमुक्तीची मूलतत्त्वे असून संविधान त्यांना बळकटी देते. आपले संविधान हे अखंड भारताच्या विकासाचे बलस्थान असून उन्नतीचा मार्ग सर्वांना उपलब्ध करून देण्याची संधी संविधानामुळे आपल्याला मिळते. देशाची एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी भारतीयांनी कटिबद्ध असले पाहिजे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत संविधानिक जाणीव आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने संविधान वाचलेसमजले आणि आचरणात आणले पाहिजे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे भारतीय लोकशाही अधिक मजबूत व सक्षम बनली आहे. सामाजिक न्यायसमान संधी आणि मानवीमूल्यांची जपणूक ही आंबेडकरांची शिकवण आजही तितकेच महत्वपूर्ण असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. संविधानाचा अभ्यास प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. संविधानिक सजगतेची आवश्यकता वाढली असून नागरिकांनी आपल्या अधिकारांबरोबरच कर्तव्यांबद्दलही जागरूक राहावेअसे मत त्यांनी जोंधळे यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केले.

 

भारतीय संविधान आपल्याला न्यायसमता आणि प्रगतीची दिशा दाखवते- ड. गोरक्ष लोखंडे

 

महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात ज्ञानाचा दिवा पेटवून सामाजिक समतेची पायाभरणी केली. हा विचार भारतीय संविधानात अधोरेखित झाला असून भारतीय संविधान आपल्याला न्यायसमता आणि प्रगतीची दिशा दाखवते. या संविधानिक मूल्यांची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणारे विद्यार्थी आपल्या शहराचा अभिमान आहेत. त्यांच्या कष्टशिस्त आणि ध्येयवादी प्रयत्नांमधून सक्षम व उत्तरदायी प्रशासन निर्माण होण्यास मदत होईल. संविधान दिनाच्या निमित्ताने  अशा गुणवान विद्यार्थ्यांचा सन्मान लोकशाहीला अधिक बळकटी देण्याची प्रेरणा ठरणार आहेअसे देखील ड. गोरक्ष लोखंडे म्हणाले.

 

 

स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

 

संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने स्पर्धा परीक्षेत यश मिळविणाऱ्या महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये लक्ष्मण झोरेसचिन मानेदिनकर गायकवाडअनिता चट्टेकारअभिषेक नऱ्हेप्रियांका टिळेकरसुजाता यमगरपूजा देशमुखशुभांगी मगरनिखील टोकेसंतोष फसले आदींचा समावेश होता.


 

संविधान महाजलश्यातून भारतीय संविधानाला मानवंदना

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या  मार्गदर्शनाखाली संविधान दिनानिमित्त २६,२७ नोव्हेंबर रोजी पिंपरी येथील क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील (भीमसृष्टी) मैदानात प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी संविधान दिनी पहिल्या सत्रात सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे व शाहिर सुरेश सूर्यवंशी यांनी आपल्या भावपूर्ण आवाजात गीते व पोवाडे सादर केले.  त्यांच्या सुरेल गाण्यांतून भारतीय संविधानाची महतीसमतेचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव प्रभावीपणे व्यक्त झाला. सुरेश सूर्यवंशी यांनी शाहिरीच्या लयीतून सामाजिक जागृतीसंघर्षाचा इतिहास आणि मानवमुक्तीची तळमळ यांची जिवंत चित्रमाला उपस्थितांसमोर उभी केली. तर सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे यांच्या मधुर आवाजातील गीतांनी संविधानिक मूल्यांची जाणीव आणि प्रेरणा निर्माण केली.  या कलाकारांनी आपल्या जादुई आवाजाने उपस्थितांमध्ये देशभक्तीसंविधानाचे महत्व आणि आंबेडकरी विचारांची सखोलता अधोरेखित केली.

 

यानंतर सुप्रसिद्ध गायक संदेश उमप व सहकाऱ्यांनी महाजलश्यातून भारतीय संविधानाला सांगीतिक मानवंदना दिली. सुप्रसिद्ध गायक अजय देहाडेप्रबुद्ध जाधवप्रतिक सोळसेदिनकर हिरोडेआसावरी तांबेप्रज्ञा वळूंज यांनी भारतीय संविधानाचा गुण गौरव करणारे गीते सादर करून भारतीय संविधान आणि संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.

 

संविधानाचं पुस्तक हातातभीमराव बसला रथात”, “आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे”, “सोन्याच्या पेनाने घटना लिहितो भीमराव माझा”, “मै भीमराज की बेटी”, “भीमराव माझा रुपया बंधा” लई बळ आलं माझ्या दुबळ्या पोरातअशी विविध सुमधुर गाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संदेश उमप व सहकाऱ्यांनी जादुई आवाजात सादर केली. या सादरीकरणाने उपस्थितांच्या अंत:करणात अभिमानप्रेरणा आणि कृतज्ञतेची नवचैतन्यपूर्ण लहर उसळली. या कार्यक्रमात युवकमहिला आणि आबालवृद्ध सामील झाले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.