मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया पुण्यात दाखल

0 झुंजार झेप न्युज

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी २० क्रिकेट सामना पुण्यात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ आज (बुधवारी) पुण्यात दाखल झाला आहे.
पुण्यातील लोहगाव विमानतळावर दुपारी एक च्या सुमारास भारतीय आणि श्रीलंकन संघातील खेळाडूंचे आगमन झाले. उद्या एक दिवस सराव करणार असून त्यानंतर १० तारखेला शुक्रवारी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा मिळवण्याचा भारतचा प्रयत्न असेल तर श्रीलंकेने हा सामना जिंकला तर मालिका १-१ अशी बरोबरीत सुटेल. त्यामुळे मालिकेचे भविष्य हे पुण्यातील सामन्यावर अवलंबून आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.