वीज बिल भरु नका, प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन

0 झुंजार झेप न्युज

 

वीज बिल भरु नका, प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन

बिलं भरली नाहीत तर पन्नास टक्के सवलत मिळेल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.


नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. ग्राहकांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारला आहे. लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी कालच सांगितलं होतं. (Prakash Ambedkar appeals not to pay Electricity Bill)

लॉकडाऊन काळातील वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलं. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीज बिल भरु नये, असं आवाहन केलं आहे. बिलं भरली नाहीत तर पन्नास टक्के सवलत मिळेल, असा दावाही आंबेडकर यांनी केला.

राज्यातील वीज ग्राहकांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय झाला होता, तो कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला, याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकर आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने ‘सरासरी’ कार्यक्षमता न दाखवल्याने आणि वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे, असा घणाघाती आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरवरुन केला आहे.

भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास पोहोचली होती. कोरोना काळात वीज बिले भरले न गेल्याने महावितरणची थकबाकी 9 हजार कोटींनी वाढून ऑक्टोबरमध्ये 59 हजार 102 कोटींवर पोहोचली. मार्च 20 ला घरगुती ग्राहकांकडे असलेली 1374 कोटींची थकबाकी ही 4824 कोटींवर पोहोचली, तर वाणिज्य ग्राहकांची थकबाकी 879 कोटींवरुन 1241 कोटींवर आणि औद्योगिक ग्राहकांची थकबाकी 472 वरुन 982 कोटींवर पोहोचली, असा दावाही राऊत यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.