पिंपरी चिंचवडच्या ‘वायसीएम’चा मोठा निर्णय, शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे वायसीएम रुग्णालय हे कोरोनाशिवाय इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी सुरु करण्यात आले आहे.

 पिंपरी चिंचवड : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे वायसीएम रुग्णालय हे इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांशिवाय इतर आजाराच्या रुग्णांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या रोज बाह्य रुग्ण विभागात कोरोना रुग्णांशिवाय आठशे ते एक हजार रुग्णांची ओपीडीमध्ये नोंद होत आहे. त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्ग मार्चपासून सुरू झाला तेव्हापासून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सध्या रोज 15 ते 20 शस्त्रक्रिया होत आहेत. तर दिवसाला 20 ते 25 महिलांची प्रसूती केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

गेले नऊ महिने पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या झपाट्याने झाला. दररोज कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय होती तसंच मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत होती. महाराष्ट्रात तर पुणे-पिंपरी चिंचवडची कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली होती. अशा परिस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होऊन बरे झाले. कोरोनाचा बिमोड करण्यात आणि रुग्णांनी आजारावर मात करण्यात वायसीएमचा मोठा वाटा आहे.

दरम्यान, राज्यासह पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली आहे. अगदी मोजक्या संख्येने आता कोरोना रुग्ण मिळत आहेत. पिंपरी चिंचवड प्रशासन आणि आरोग्य विभागाने कोव्हिड काळात नागरिकांची चांगली काळजी घेतली. आता नागरिकही कोरोना नियमांचं पालन करत असल्याने शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.