महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांची राजभवन येथे निवेदन देऊन भेट घेण्यात आली.
बहुजन समाज पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा ऍड संदीप ताजने यांनी राज्यपालांची भेट घेऊन सर्व सामान्य नागरिकांना रुपये 10 हजार कोटींची विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी महासचिव प्रशांत इंगळे, महाराष्ट्र महासचिव रामसुमेर जैस्वार,प्रदेश सचिव राजपाल गावंडे सोबत होते.
महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांची राजभवन येथे निवेदन देऊन भेट घेण्यात आली तसेच निवेदनाद्वारे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उध्वजी ठाकरे ह्यांना मागणी करण्यात आली की महाराष्ट्रा करीता दहा हजार कोटि रुपयांचे विशेष पैकेज व प्रत्येकी दहा हजार रुपए सानुग्रह अनुदान शेतकरयांना व गोरगरीबांकरीता देण्यात यावे बसपाची प्रमुख मागणी.परम आदरणीय बहन कुमारी मायावती जी यांच्या दिशा निर्देशानुसार तसेच आदरणीय खासदार वीर सिंग जी राष्ट्रीय* *महासचिव प्रदेश प्रभारी व आदरणीय प्रमोद जी रैना प्रदेश प्रभारी यांच्या* मार्गदर्शनाखाली आज दिनांक ९/४/२०२१ रोजी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने माननीय *महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य भगतसिंग कोशीयारी जी यांची राजभवन मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय एडवोकेट संदीप जी ताजणे यांच्या* *नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट ** *घेतली** सदर शिष्टमंडळामध्ये प्रशांत इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य, राम सुमैर जी जैसवार महासचिव महाराष्ट्र राज्य तसेच राजपाल जी गावंडे सचिव महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.
*राज्यात करोनाचा भयंकर उद्रेक झाला* असल्याने संपूर्ण जनता हवालदिल झाली आहे. आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असून रुपयांना उपचाराअभावी दिवस काढावे लागत आहेत दुसरीकडे लाॅकडाउन स्थितीमुळे कोट्यावधी लोकांचा रोजगार गेला आहे. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे अशा या संकट समयी राज्यातील जनतेला आपण दिलासा देणे आवश्यक आहे असे मत चर्चेअंती बसपा अध्यक्ष संदीप ताजने जी यांनी व्यक्त केले तसेच निवेदनाद्वारे महामहिम राज्यपाल व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे
१)१० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून खाजगी मधील सर्व आरोग्य सेवा अनुदानित करावी तसेच आरोग्य यंत्रणेवरील भार कमी करण्याचे उपाय करावे आणि कुणीही उपचाराविना राहणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
२) राज्यात विनावेतन असणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे कुटुंबातील किमान चार सदस्यांना तरी ही मदत मिळावी.
३) तपासणी केंद्र वाढवावे आणि आठ तासाच्या आत मोबाईलवर अहवाल द्यावा यातून रुग्णांवर लगेच उपचार सुरू होतील.
४) रेमडीसिवर इंजेक्शन ची किंमत कमी केल्यानंतरही एमआरपी नुसार वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने सर्वांना हे इंजेक्शन निशुल्क उपलब्ध करून द्यावे.
५) सरकारने लाॅक डाऊन स्थिती तयार केलेली आहे. लहान-मोठे व्यवसाय उद्योगधंदे आणि इतर कामे ठप्प आहेत. लोकांकडे पैसे नाहीत त्याकरिता वीज बिल माफ करावे.
६) विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्यावी
७) शाळा महाविद्यालयांचे शुल्क माफ करावे
8) खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना बी बियाणे व खते मोफत द्यावे
९)व्यापारी वर्ग हॉटेल्स व दुकाने यांना संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू राहण्यास परवानगी द्यावी.
१०) दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात विद्यार्थ्यांचे जीव विनाकारण धोक्यात घालू नये.
वरील सर्व मागण्या मान्य न झाल्यास बसपाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीप जी ताजने यांनी दिला.

